मालगाडीचे १६ डबे घसरले, दक्षिणेकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

 राजुरा तालुक्यातील विहीरगावजवळ मालगाडीचे १६ डबे घसरल्याने दक्षिणेकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.  कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डबे घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे ६० रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

Updated: Jan 6, 2017, 04:21 PM IST
मालगाडीचे १६ डबे घसरले, दक्षिणेकडे जाणारी वाहतूक विस्कळीत title=

चंद्रपूर :  राजुरा तालुक्यातील विहीरगावजवळ मालगाडीचे १६ डबे घसरल्याने दक्षिणेकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.  कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डबे घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे ६० रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

रेल्वे रूळाला तडे गेल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. हा अपघात रात्री उशिरा झाला. कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डबे घसरल्याने हा अपघात झाला आहे. उद्यापर्यंत मार्ग सुरूळीत सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. मालगाडीच्या बोगी रुळावरून हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.  

या मार्गावरुन ६० रेल्वे गाड्या ये-जा करतात. त्यामुळे या सर्व गाड्या चंद्रपूर-बल्लारशा रेल्वे स्थानक वगळून माजरी रेल्वे स्थानका मार्गे वळवण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेमुळे सुमारे पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.