'शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, मुंबईच्या विकासासाठी निधी द्या'

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोष गंगवार यांची भेट घेतली. 

Updated: Jan 21, 2017, 08:16 AM IST
'शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, मुंबईच्या विकासासाठी निधी द्या' title=

नवी दिल्ली : आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थराज्यमंत्री संतोष गंगवार यांची भेट घेतली. 

यात शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ आणि गजानन किर्तीकर यांचा समावेश होता. वेळ देऊनही अर्थमंत्री अरुण जेटली आणि शिवसेना खासदारांची भेट होऊ शकली नाही. जेटली दौ-यावर असल्याने अर्थराज्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेनं आपल्या मागण्याचं निवेदन सादर केलं. 

पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करावं, शेतक-यांचं कर्ज माफ करावं, शेतक-यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत आणि मुंबईच्या विकासासाठी निधी मिळावा असे विविध मुद्दे बजेटमध्ये असावेत अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.