चित्तूरच्या जंगलात पोलीस चकमकीत २० चंदन तस्कर ठार

आंध्रप्रदेशमधील तिरुपतीजवळ चंदन तस्करी करणारी टोळी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत २० चंदन तस्कर ठार झाले आहेत. 

PTI | Updated: Apr 7, 2015, 02:59 PM IST
चित्तूरच्या जंगलात पोलीस चकमकीत २० चंदन तस्कर ठार title=

हैदराबाद: आंध्रप्रदेशमधील तिरुपतीजवळ चंदन तस्करी करणारी टोळी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत २० चंदन तस्कर ठार झाले आहेत. 

आज सकाळी तिरुपतीजवळील चित्तूर इथं चंदन तस्करांविरोधात स्थानिक पोलीस आणि वन विभागानं मोहीम राबवली. या मोहीमेदरम्यान चंदन तस्कर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. 

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सुमारे २० चंदनतस्करांचा मृत्यू झाला आहे. चित्तूरमधील घनदाट जंगलात अजूनही चकमक सुरु असल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.