वेगळे झाले तनिषा आणि अरमान

बिग बॉसच्या 7व्या सिझनमध्ये अरमान आणि तनिषा ऐकमेकांच्या जवळ आलेले होते. हा सिझन संपल्यानंतर देखील दोघांच्या ही प्रेमाच्या चर्चा मात्र सर्वत्र रंगत  होत्या. अनेक कार्यक्रमात दोघे जण एकत्र दिसत होते. ते लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. पण, आता हे दोघे सहमतीने वेगळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्या दोघांनी कधी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही.

Updated: Sep 23, 2014, 08:20 PM IST
वेगळे झाले तनिषा आणि अरमान title=

नवी दिल्ली : बिग बॉसच्या 7व्या सिझनमध्ये अरमान आणि तनिषा ऐकमेकांच्या जवळ आलेले होते. हा सिझन संपल्यानंतर देखील दोघांच्या ही प्रेमाच्या चर्चा मात्र सर्वत्र रंगत  होत्या. अनेक कार्यक्रमात दोघे जण एकत्र दिसत होते. ते लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. पण, आता हे दोघे सहमतीने वेगळे झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्या दोघांनी कधी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही.
 

तनिषा आणि अरमान  दोन वेगवेगळ्या स्वभावचे व्यक्ती आहे. दोघांनी एका वर्षापासून  अनेक चांगले-वाईट अनुभव घेतले होते. तरीही दोघांनी ऐकमेकांचा हात सोडला नाही.

मात्र, आता त्यांनी वेगळे होण्याच निर्णय घेतला आहे. दोघेजण स्वत:च्या करिअरवर लक्ष्य केंद्रीत करणार असल्याचे सूत्रांकडून कळतेय. तनीषा ही तिच्या आईसोबत टी. मुखर्जी नावची  सिनेमा निर्माण करणारी  कंपनी उघडण्याच्या तयारीत आहे. तर अरमान हा सिनेमात पुन्हा एकदा पदार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.