कटप्पाने बाहुबलीला का मारलं? राजामौलींनी केला खुलासा

बाहुबली चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येत प्रेक्षकाच्या मनात अद्यापही हाच प्रश्न कायम आहे तो म्हणजे कटाप्पाने बाहुबलीला का मारलं. याची अनेकांनी काहीबाही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Apr 1, 2016, 11:36 AM IST
कटप्पाने बाहुबलीला का मारलं? राजामौलींनी केला खुलासा title=

मुंबई : बाहुबली चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येत प्रेक्षकाच्या मनात अद्यापही हाच प्रश्न कायम आहे तो म्हणजे कटाप्पाने बाहुबलीला का मारलं. याची अनेकांनी काहीबाही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

मात्र आता खुद्द या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी याचा खुलासा केलाय. यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेय.

त्यांना जेव्हा विचारले कटप्पाने बाहुबलीला का मारल तेव्हा राजामौली म्हणाले, कारण मीच त्याला म्हणजे कटप्पाला बाहुबलीला मारण्यास सांगितले होते.

हे उत्तर बरोबर आहे की नाही याची माहिती बाहुबली २ रिलीज झाल्यानंतरच प्रेक्षकांना मिळेल. येत्या १४ एप्रिलला या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होतोय. गेल्या वर्षी १० जुलै रोजी बाहुबली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तब्बल ६०० कोटीहून अधिक कमाई केली होती.