महाड पूल दुर्घटना : एसटीसह अन्य खासगी वाहनातील हे आहेत बेपत्ता प्रवासी

मुंबई गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता लोकांची नावे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. एसटीतील २२ आणि खासगी वाहनातील अनेक प्रवासी बेपत्ता आहेत.

Updated: Aug 4, 2016, 12:03 AM IST
महाड पूल दुर्घटना : एसटीसह अन्य खासगी वाहनातील हे आहेत बेपत्ता प्रवासी  title=

मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता लोकांची नावे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. एसटीतील २२ आणि खासगी वाहनातील अनेक प्रवासी बेपत्ता आहेत.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर २ ऑगस्ट २०१६च्या मध्यरात्री पोलादपूर - महाड रस्त्यावर सावित्री नदीचा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.  या मार्गावर रत्नागिरी जिल्हयातील जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरवली या एस्टी बसेस वाहून गेल्या आहेत.

जयगड-मुबई (गाडी क्र.एम एच 20 - 1538 ) सायंकाळी 6.30 वरुन मार्गस्थ झाली होती. या गाडीवर चालक श्रीकांत शामराव कांबळे, बि.नं.8234 वय 58 वर्षे रा.सावर्डा पोलीस लाईन,  चिपळूण.  वाहक विलास काशिनाथ देसाई बि.नं.38865  43 वर्षे रा.सती,ता.चिपळूण हे होते. या गाडीमध्ये  सत्कोंडी, ता. रत्नागिरी  येथील सुनील महादेव बैकर, 35 वर्षे, मोबाईल क्रमांक 9667449908 , स्नेहा सुनील बैकर, 30 वर्षे मोबाईल क्रमांक 9667449908, दीपाली कृष्णा बलेकर (भूमी भूषण बसेकर), अनिल संतोष बलेकर, नातेवाईकाचे नाव प्रमोद महादेव बैकर मोबाईल क्रमांक 7745065502 व 9545465502 असे आहेत. 

भंडारपुळे, ता. रत्नागिरी येथील प्रशांत प्रकाश माने, वरवडे ता. रत्नागिरी येथील धोंडू बाबाजी कोकरे, 65 वर्षे, कांबळे लावगण, ता. रत्नागिरी येथील अविनाश सखाराम मालप, 48 वर्षे , राजापूर ता.राजापूर येथील जितू जैतापकर, 32 वर्षे  आणि  सावर्डा पोलीस  लाईन, चिपळूण येथील एस.टी. वाहक श्रीकांत शामराव कांबळे यांचा मुलगा महेंद्र श्रीकांत कांबळे आदी प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
    
राजापूर -बोरीवली (गाडी क्र. एम एच 40 एन 9739) या गाडीवर चालक गोरखनाथ सितारा मुंडे, बि.नं.18759, 46 वर्षे रा.गंगाखेड,परभणी.  वालक प्रभाकर भानूराव शिर्के बि.नं.13807, 58 वर्षे रा.राजवाडी ता. संगमेश्वर हे होते. गाडीमध्ये लॅण्डसन पार्क, काविळतळी, ता. चिपळूण येथील आतीफ मेमन चौगुले मोबाईल क्रमांक 7715814378, आवेद अल्ताफ चौगुले, नातेवाईकाचे नांव अहमद चौगुले, मोबाईल क्रमांक 8097248420 असा आहे. 

नाणार ता. राजापूर येथील बाळकृष्ण बाब्या वरक, 51 वर्षे,  जयेश बाणे वय 36वर्षे, रा.सोलगांव, ता.राजापूर. अजय सिताराम गुरव,  40 वर्षे, रा.ओणी, ता.राजापूर , सोनगिरी ता. संगमेश्वर येथील विजय विक्रम पंडीत, 40 वर्षे, विनिता विजय पंडीत वय  35 वर्षे, नातेवाईकांचे नाव विलास पाटणकर, मोबाईल क्रमांक 8652121853 आहे. तसेच श्री. वाघू  आदी प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.    

रत्नागिरी तालुक्यातील जयगड-कुणबीवाडी येथील १ तवेरा गाडी दि. 2 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी मुंबईच्या दिशेने निघाली होती. तवेरामध्ये आठ लोक आहेत. त्यातील एका व्यक्तीचे नांव दिनेश कांबळी असेअसून त्याचा मोबाईल क्रमांक 9423262859 असा आहे.  

तसेच नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार रमेश कदम, रा.नांदिवसे ता.चिपळूण हे 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबईला निघाले होते, परंतु सद्यस्थितीत त्यांच्याशी संपर्क होत नाही. सदरची माहिती सुशांत मोहिते, मोबाईल क्रमांक 9403579849 यांनी दिली आहे.

तहसीलदार गुहागर यांनी नियंत्रण कक्षाला दिलेल्या अहवालानुसार 2  ऑगस्ट 2016 रोजी खाजगी गाडीने गुहागर तालुक्यातील काही व्यक्ती खाजगी मुंबईच्या दिशेने गेल्या होत्या. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. 2 ऑगस्ट 2016 रोजी रात्री 11.०० वाजता सुमारास तालुका महाड, जि. रायगड येथे राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेमध्ये स्थानिक चौकशी (मिलिंद मिरगल मोबाईल क्रमांक 9892222862) केली असता गुहागर तालुक्यातील या दुर्घटनेमध्ये गाडी क्रमांक एम एच 04-7837 मध्ये  जयवंत सखाराम मिरगल,  बाबा सखाराम मिरगल, जयवंत सखाराम मिरगल, मुळगाव जाभांरी जवळेवाडी सध्या वाकोला, सांताक्रुझ, दत्तमंदिर, मुंबई.  मंगलमूर्ती अपार्टमेंट 101, छप्परपाडा, सानपाडा, नवी मुंबई येथील दत्ताराम भागोजी मिरगल.   

संपदा संतोष वाजे, 40 वर्षे , संतोष सिताराम वाजे, 40 वर्षे मुळ गाव संगमेश्वर व सध्या अमृतनगर गणपती मंदिराजवळ, घाटकोपर, मुंबई.  आदिनाथ कांबळे, 45 वर्षे,मुळ गाव चाफेरी गवळवाडी जयगड सध्या जागेश्वरी.  दिनेश सखाराम कांबळे, 40 वर्षे, मूळ गाव चाफेरी जयगड सध्या मुंबई बोरीवली यांचा समावेश आहे.

नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार रमेश कदम, नांदिवसे, ता. चिपळूण हे  2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबईला निघाले होते, पंरतु सद्य:स्थितीत त्यांच्याशी संपर्क होत नाही. सदरची माहिती सुशांत मोहिते मो.क्र.9403579849 यांनी दिली आहे.

चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील ओवेस दळवी हे ०२ ऑगस्ट 2016 रोजी मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती मुकादम मोबाईल क्रमांक.9890000323 यांनी दिली . तसेच दोणवली येथील पांडुरंग बाबू घाग आणि गणेश कृष्णा चव्हाण दोघेही 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबईच्या दिशेने निघाले होते, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती रामदास जाधव मोबाईल क्रमांक9403026318 यांनी दिली आहे. ही सर्व माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.