मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा...

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणेकरांना दिलासा दिलाय... दिवा स्थानकात आता फास्ट लोकल्सही थांबणार आहेत.

Updated: Jan 10, 2015, 09:37 AM IST
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा...  title=

मुंबई : रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणेकरांना दिलासा दिलाय... दिवा स्थानकात आता फास्ट लोकल्सही थांबणार आहेत.

याशिवाय मुलुंड-ठाणे दरम्यान मेंटल हॉस्पीटलजवळील नवं स्टेशन सुरु करण्यासाठी तांत्रिक बाबी तपासून घ्याव्यात, अशी घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केलीय. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांचा हा दौरा ठाणेकरांसाठी भलताच फलदायी ठरलाय.

गेल्या आठवड्यात पेंटाग्राफ तुटल्यानंतर कोलमडलेल्या रेल्वे सेवेमुळे संतप्त प्रवाशांनी दिवा स्थानकाची तोडफोड केली होती... यानंतर, रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चाही पार पडली होती. गर्दीच्या वेळी रेल्वेचा ताण हलका करण्यासाठी आणखी उपायांची गरज असल्याचं या आंदोलनानंतर प्रशासनाच्या चांगलंच लक्षात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.