ठाण्यातील धडक कारवाईनंतर आता कळवा रेतीबंदराकडे आयुक्तांचा मोर्चा

 गेले काही दिवस शहरातील डान्स बार, लॉज, गॅरेजेस, हुक्का पार्लर्सवर धडाकेबाज कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला मोर्चा आता पारसिक रेतीबंदराकडे वळविला आहे.

Updated: Dec 6, 2016, 09:57 PM IST
ठाण्यातील धडक कारवाईनंतर आता कळवा रेतीबंदराकडे आयुक्तांचा मोर्चा  title=

ठाणे :  गेले काही दिवस शहरातील डान्स बार, लॉज, गॅरेजेस, हुक्का पार्लर्सवर धडाकेबाज कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला मोर्चा आता पारसिक रेतीबंदराकडे वळविला आहे.

कळवा येथील पारसिक रेतीबंदरच्या सुमारे 4 किमी परिसरातील सर्व बांधकामे महानगरपालिकेच्यावतीने  उद्यापासून पाडण्यात  येणार आहेत. दरम्यान येथील रहिवाशांचे आणि व्यावसायिक धारकांचे पूर्वसन करण्याची हमी आयुक्त जयस्वाल यांनी दिली आहे.

पुढील पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी ठाणेकरांचे चौपाटीचे स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.