'तर कोपर्डी प्रकरणात चिंधड्या केल्या असत्या'

मंत्री राहिलो नसतो तर कोपर्डी प्रकरणात विधानसभेत चिंधड्या चिंधड्या केल्या असत्या, असे वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

Updated: Aug 8, 2016, 05:58 PM IST
'तर कोपर्डी प्रकरणात चिंधड्या केल्या असत्या' title=

जळगाव : मंत्री राहिलो नसतो तर कोपर्डी प्रकरणात विधानसभेत चिंधड्या चिंधड्या केल्या असत्या, असे वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. मंत्रिपद दिल्याने पक्षाचे नुकसान होईल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही म्हणाले होते असं विधान गुलाबराव पाटील यांनी जळगावात केलं आहे. 

गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याने त्यांची आक्रमकता मंत्रीपदामुळे कमी झालीय यावर मोहर लागली आहे. जे पोलीस गणेशोत्सव काळात मला कायद्याने नोटीस जारी करायचे तेच आता मंत्री झाल्याने माझ्या मागे पुढे फिरतात हे चित्र पाहून विश्वास बसत नाही, असंही मिश्लिक शैलीत ते म्हणाले. शिक्षक संघटनेच्यावतीने राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.