तोडगा निघाला तरी संभ्रम कायम

शेतकरी संघटनांनी ऊस दरवाढीसाठी पुकारलेल्या आंदोलनावर तोडगा निघाला असला तरी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने तो आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलं आहे. सरकारने देऊ केलेला वाढीव दर एक रकमी देणार किंवा हप्त्या हप्त्याने देणार याबाबत संदिग्धता असल्याचं मत शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीने व्यक्त केली आहे.

Updated: Nov 11, 2011, 03:14 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

शेतकरी संघटनांनी ऊस दरवाढीसाठी पुकारलेल्या आंदोलनावर तोडगा निघाला असला तरी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने तो आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलं आहे. सरकारने देऊ केलेला वाढीव दर एक रकमी देणार किंवा हप्त्या हप्त्याने देणार याबाबत संदिग्धता असल्याचं मत शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीने व्यक्त केली आहे.
पण यासंदर्भात राजू शेट्टींच्या संघटनेने सरकारने दिलेल्या पत्रानुसार ऊसाचे पैसे एकरकमी दिले जाणार असल्याचं नमुद केलं असल्याने ते पैसे आपण एकरकमीच स्वीकारू असं म्हटलं आहे. त्यामुळे सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये या वादावर तोडगा निघाला असला तरी संभ्रम कायम असल्याचं चित्र समोर आलं आहे.