सांगली जिल्ह्यात तीन महिलांची हत्या

जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हिवरेगावात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून, तीन महिलांची रविवारी निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

Updated: Jun 21, 2015, 11:25 PM IST
सांगली जिल्ह्यात तीन महिलांची हत्या title=

सांगली : जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हिवरेगावात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून, तीन महिलांची रविवारी निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

 तिसऱया महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सांगली पोलीसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे.

सुनीता विजय पाटील राहणार वायफळे, प्रभावती ब्रह्मदेव शिंदे, राहणार हिवरे यांचा जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे हिवरे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.