...नाही तर उद्धव ठाकरे थट्टेचा विषय बनतील

 शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या भविष्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. त्यांनी पक्षाला योग्य दिशेने घेऊन गेले नाही तर ते थट्टेचा विषय बनतील, अशी टीका काँग्रेसचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.त महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर भाष्य करताना ते बोलत होते. 

Updated: Nov 12, 2014, 03:39 PM IST
...नाही तर उद्धव ठाकरे थट्टेचा विषय बनतील title=

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या पक्षाच्या भविष्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. त्यांनी पक्षाला योग्य दिशेने घेऊन गेले नाही तर ते थट्टेचा विषय बनतील, अशी टीका काँग्रेसचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.त महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेवर भाष्य करताना ते बोलत होते. 

नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना माहित नाही की, ते कोणत्या बाजूला आहे आणि का आहेत. त्यांना माहितच नाही की ते आपल्या पक्षाला भविष्यात कुठे घेऊन जाणार आहेत. त्यांना शिवसेनेला आता अशा ठिकाणी नेऊन ठेवले आहे की त्यांच्याकडे कोणताच पर्याय उपलब्ध नाही.

शिवसेनेला जी काही ऑफर देण्यात येईल तेव्हा ते मान्य करतील ते सरकारमध्ये सामील होतील की विरोधी पक्षात सामील होतील याला काहीच अर्थ नाही. जर एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाला माहीत नाही की त्यांचा पक्ष कुठे जाईल. तर असा पक्ष महाराष्ट्राच्या जनतेसाठी कसा लढू शकेल. त्यांनी लवकरच आपल्या पक्षाला पुनर्जीवित केले नाही तर ते लवकरच थट्टेचा विषय बनतील. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.