युती ही राजकीय नव्हती, कौटुंबिक होती – आदित्य ठाकरे

 भाजप-शिवसेना युती तुटल्याबद्दल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दुर्दैवी म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

Updated: Sep 25, 2014, 11:12 PM IST
युती ही राजकीय नव्हती, कौटुंबिक होती – आदित्य ठाकरे  title=

मुंबई  : भाजप-शिवसेना युती तुटल्याबद्दल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दुर्दैवी म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

आदित्य ठाकरे यांचे काही ट्विट - 
शिवसेनेने नेहमी भाजपच्या वाईट काळात साथ दिली होती. पण राज्यातील भाजपने २५ वर्षाची युती तोडण्याचा निर्णय घेतला हा खूप खेदजनक आहे. 

या युतीला माननीय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद काकाच्या विचारांनी आणि विकासाच्या धोरणांनी बनवले होते. शिवसेना-भाजप युती हा राजकीय नव्हती, हे एक कुटुंब होते जे माझे आजोबा, प्रमोद काका, अटल जी आणि अडवाणीजींनी उभे केले होते. 

माझ्या जन्माच्या अगोदरपासून ही युती होती. मी भाजप नेते आणि सदस्यांच्या एकीकरणाच्या वातावरणात वाढलो. याच्या खूप आठवणी आहेत. 

एकीकरण आणि कुटुंबिक एकोपा माझ्या लहानपणापासून पाहत आहे. याचा एक लहान मुलगा सदैव साक्षीदार असणार आहे. 

या युतीने अनेक चढ उतार, आव्हाने आणि आंदोलनं पाहिलीत, पण त्याला आम्ही एकत्रपणे समोरे गेलो, यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ समोर ठेवला नाही.  

गेल्या पाच दिवसांपासून यावर कोणतेही भाष्य करण्याचे मी टाळले होते. भाजपच्या काही स्वार्थी नेत्यांना माझे वय दिसले पण युती टिकवण्यासाठी तळमळ दिसली नाही. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.