भारताच्या विजयावर पाकिस्तानच्या बॉलरने घेतली शंका

पाकिस्तानचा पूर्व स्पिनर तौसीफ अहमद याने भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या सामन्याच्या चौकशीची मागणी आयसीसीकडे केली आहे. भारताच्या विजयावर अहमदला शंका आहे.

Updated: Mar 26, 2016, 09:19 PM IST
भारताच्या विजयावर पाकिस्तानच्या बॉलरने घेतली शंका title=

कराची : पाकिस्तानचा पूर्व स्पिनर तौसीफ अहमद याने भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या सामन्याच्या चौकशीची मागणी आयसीसीकडे केली आहे. भारताच्या विजयावर अहमदला शंका आहे.

अहमद म्हणतो की 'ज्याप्रकारे शेवटच्या ओव्हरमध्ये बांग्लादेशने भारताला विजय बक्षीसमध्ये देऊन टाकला त्यामागे कोणताही तर्क दिसत नाही.'

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटलं की, 'ज्याप्रकारे सामना संपला मला नाही वाटत सगळं काही ठिक आहे. मला वाटतं की आयसीसीने याची चौकशी केली पाहिजे.'