संघात निवड झाल्यानंतरही परवेझला ही खंत

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन यांच्या जागी अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांना स्थान देण्यात आलेय.

Updated: Jan 24, 2017, 11:05 AM IST
संघात निवड झाल्यानंतरही परवेझला ही खंत title=

कानपूर : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन यांच्या जागी अमित मिश्रा आणि परवेझ रसूल यांना स्थान देण्यात आलेय.

संघात निवड झाल्याचा आनंद परवेझला आहेच मात्र त्याचबरोबर त्याने एक खंतही व्यक्त केलीये. मला माहीत नव्हतं की अश्विनला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलीये. 

'जेव्हा मला बीसीसीआयकडून फोन आला तेव्हा मी विचार केला की मला पहिल्यांदा अश्विनसोबत ड्रेसिंग रुममध्ये वेळ घालवता येईल. त्यामुळे मला या दिवसांत खूप काही शिकता येईल. मात्र आता अश्विनच या मालिकेत खेळणार नाही,' अशा शब्दात त्याने आपली खंत व्यक्त केली.

मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी जम्मूमध्ये राष्ट्रीय टीमसह ट्रेनिंग करत होतो. त्यावेळी सकाळी बीसीसीआय कार्यालयाकडून मला फोन आणि आता मी दिल्लीसाठी उड्डाण केले.