कोलंबो कसोटी : भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Aug 3, 2017, 09:55 AM IST
कोलंबो कसोटी : भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

पहिल्या सामन्यात आजारी असल्याने खेळू न शकलेला लोकेश राहुल दुसऱ्या सामन्यात सलामीवीराची भूमिका साकारणार आहे. लोकेश राहुलचा संघात समावेश झाल्याने अभिनव मुकुंद संघाबाहेर असेल. संघात इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. 

पहिल्या सामन्यात शिखर धवनने चांगली कामगिरी केली होती. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. त्यामुळे या सामन्यात शिखर धवन आणि लोकेश राहुल सलामीला उतरतील. 

दुसरीकडे श्रीलंकेच्या संघात पुष्पकुमारा हा क्रिकेटर पदार्पण करतोय. श्रीलंकेच्या संघात तीन बदल कऱण्यात आलेय. धनुस्का, कुमारा आणि असेला दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. तर चंडीमल, मलिंदा आणि धनंजया यांचा संघात समावेश करण्यात आलाय.