'हरभजन सिंगने कानाखाली मारली म्हणून रडत नव्हतो ...', श्रीसंतने अखेर इतक्या वर्षांनी केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज एस श्रीसंतने आयपीएल 2008 मधील स्लॅपगेट प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. पहिल्या हंगामात हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानाखाली लगावली होती. यानंतर बराच मोठा वाद झाला होता. याचं कारण श्रीसंत मैदानात जाहीरपणे रडला होता.   

शिवराज यादव | Updated: May 12, 2024, 07:41 PM IST
'हरभजन सिंगने कानाखाली मारली म्हणून रडत नव्हतो ...', श्रीसंतने अखेर इतक्या वर्षांनी केला खुलासा title=

भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज एस श्रीसंतने पुन्हा एकदा आयपीएलमधील सर्वात वादग्रस्त स्लॅपगेट प्रकरणावर भाष्य केलं आहे. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये हा वाद प्रचंड गाजला होता. या हंगामात श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यात मोठा वाद झाला होता. सामन्यानंतर हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानाखाली लगावली होती. यामुळे श्रीसंत मैदानावर जाहीरपणे रडला होता. तो रडल्यानेच हा वाद समोर आला होता. हरभजन सिंगला याची मोठी किंमत चुकवावी लागली होती. त्याच्यावर संपूर्ण हंगाम बंदी घालण्यात आली होती. श्रीसंतने 'द रणवीर शो'मध्ये बोलताना आपण वेदनेमुळे नाही तर हरभजन सिंग आणि आपल्यात सुरु असलेल्या वादामुळे रडलो होतो असा खुलासा केला आहे. 

"तुम्ही पाहिल्यास, तो ३० सेकंदाचा व्हिडिओ होता किंवा मीडियानेही तो दाखवला होता...," असं श्रीसंतने आयपीएलची ती सर्वात मोठी बातमी ठरली असं बोलण्याआधी सांगितलं. "हो, अविश्वसनीय. पण मी भज्जी पा म्हणेन. आताही मी त्याला 'भज्जी पा' म्हणून संबोधतो आणि तो असा आहे जो नेहमी पाठीशी असतो. जेव्हा जेव्हा माझ्याकडे मला काही समस्या असते किंवा गोष्टी ठरल्याप्रमाणे होत नाहीत तेव्हा मी त्याला जाऊन मिठी मारायचो. भज्जी पामध्ये ती सकारात्मकता होती. ज्यामुळे मला चांगली कामगिरी करण्यात मदत व्हायची," असं श्रीसंत म्हणाला.

"त्यामुळे जेव्हा ही घटना घडली तेव्हा मला धक्का बसला. मी वेदनेमुळे नाही तर वाईट वाटल्याने रडत होतो. तो हे करु शकतो यावर मला विश्वास बसत नव्हता. कोण पाहतंय याची मला तेव्हा अजिबात काळजी नव्हती. जणू एका छोट्या भावावर मोठा भाऊ ओरडतो अशी स्थिती होती. त्याला पूर्ण हक्क होता, कारण त्याने सामन्याआधी आमच्याविरोधात फार आक्रमक होऊ नको असं सांगितलं होतं," असं श्रीसंतने सांगितलं.

श्रीसंतने यावेळी राष्ट्रीय संघासोबतच्या आपल्या कालावधीवरही भाष्य केलं. "मी हे ऐकत आलो आहे जेव्हा मी अंडर-13 ते अंडर-14 ते अंडर-16 ते अंडर-16 पर्यंत खेळत होतो. 19. नंतर आमच्याकडे कोची (टस्कर्स केरळ) संघ होता आणि ते पुन्हा देशासाठी खेळण्यासारखे होते,” तो म्हणाला.