बांगलादेशचा खुर्दा, २४० धावांनी केला पराभव

  चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे २३ व्या षटकात सर्वबाद ८४ धावांवर गडगडला. 

Updated: May 30, 2017, 09:18 PM IST
बांगलादेशचा खुर्दा, २४० धावांनी केला पराभव  title=

लंडन :   चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे २३ व्या षटकात सर्वबाद ८४ धावांवर गडगडला. 

भारताकडून उमेश आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी, बुमरा, पांड्या आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

बांगलादेशकडून मेंहदी याने सर्वाधिक २४ धावा केल्या. 

सुरूवातीला  दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले. 

भारताकडून दिनेश कार्तिकने ९४, पांड्याने ८० आणि शिखर धवन याने ६० धावांची शानदार खेळी केली. 

बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस पाचारण केले. भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सुरूवात केली. पण दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा  १ धावेवर बाद झाला.  आयपीएलचा खराब फॉर्म आजही रोहितचा कायम राहिला. त्याला रुबेल याने क्लिन बोल्ड केले. 

त्यानंतर शिखरच्या साथीला आलेला अजिंक्य राहणे चांगल्या फॉर्ममध्ये  दिसत होता. त्याने एक शानदार स्ट्रेट ड्राइव्ह चौकारही लगावला. पण त्याला मुस्तफिजुर याने क्लिन बोल्ड केले. त्याने २१ चेंडूत ११ धावा काढल्या. 

शिखर धवनने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील फॉर्म कायम ठेवत ६७ चेंडूत ७ चौकारांसह ६० धावा केल्या. केदार जाधव यानेही चांगळी फलंदाजी केली पण त्याला जास्त धावा करता आल्या नाही. त्याने ३८ चेंडूत २ चौकार आणि एक षटकारसह ३१ धावा केल्या.  

चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी करून मोठी चूक करणाऱ्या हार्दिक पांड्याने दुसऱ्या सामन्यात बांगलादेश  विरूद्ध ८० धावांची नाबाद खेळी करून संघात आपली जागा फिक्स केली. 

हार्दिक पांड्याने ५४ चेंडूत ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावा कुटल्या.  पहिल्या सामन्यात खराब गोलंदाजीमुळे हार्दिक पांड्यावर दडपण होते. त्यामुळे सुरूवातीला त्याने सावध खेळी केली. मग त्याने खऱ्या अर्थाने आपला जलवा दाखविला. रविंद्र जडेजाच्या मदतीने त्याने भारताला ३०० धावांच्या आसपास आणून ठेवले. 

भारताने ५० षटकात ७ बाद ३२४ धावांचा डोंगर बांगलादेशसमोर रचला आहे. 

बांगलादेशकडून रुबेल हुसैन याने ३, सनझुमूल इस्लाम याने २ आणि  मुस्तफिजुर याने एक विकेट घेतली. 

दिनेश कार्तिकने केले संधीचे सोने...

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने या संधीचे सोने केले. त्याने ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली. 

सराव सामन्यात सर्वांनी फलंदाजीची संधी मिळावी यासाठी त्याला रिटायर्ट आऊट करण्यात आले. त्यामुळे त्याचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले.  

भारताची खराब सुरूवात झाली, सातव्या ओव्हरमध्ये २१ धावांमध्ये २ गडी गमावले होते. त्यानंतर शिखर धवनची साथ द्यायला आलेल्या दिनेश कार्तिकने ८ चौकार आणि आणि एक षटकारासह ९४ धावांची शानदार खेळी केली. 

मनीष पांडे जखमी झाल्यामुळे १५ जणांच्या संघात दिनेश कार्तिकला संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याला अपयश आले होते. तो शून्यावर बाद झाला होता. पण आज त्याने संधीचे सोने केले. 

चॅम्पियन्स ट्रॉफी : हार्दिक पांड्याने जागा फिक्स केली... 

 चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी करून मोठी चूक करणाऱ्या हार्दिक पांड्याने दुसऱ्या सामन्यात बांगलादेश  विरूद्ध ८० धावांची नाबाद खेळी करून संघात आपली जागा फिक्स केली. 

हार्दिक पांड्याने ५४ चेंडूत ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावा कुटल्या.  पहिल्या सामन्यात खराब गोलंदाजीमुळे हार्दिक पांड्यावर दडपण होते. त्यामुळे सुरूवातीला त्याने सावध खेळी केली. मग त्याने खऱ्या अर्थाने आपला जलवा दाखविला. रविंद्र जडेजाच्या मदतीने त्याने भारताला ३०० धावांच्या आसपास आणून ठेवले. 

भारताने ५० षटकात ६ बाद ३२४ धावांचा डोंगर बांगलादेशसमोर रचला.