सराव सामन्यातील संघाच्या कामगिरीवर विराट खुश

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी दोन्ही सराव सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयावर कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केलाय. भारताने काल बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात तब्बल २४० धावांनी विजय मिळवला. 

Updated: May 31, 2017, 03:03 PM IST
सराव सामन्यातील संघाच्या कामगिरीवर विराट खुश title=

लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी दोन्ही सराव सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयावर कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केलाय. भारताने काल बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात तब्बल २४० धावांनी विजय मिळवला. 

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार ४५ धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध ३२४ धावा केल्या. यात दिनेश कार्तिकने ९४, हार्दिक पंड्याने नाबाद ८०  आणि सलामीवीर शिखर धवनने ६० धावांची खेळी केली. 

दोन्ही सामन्यात आम्हाला जे हवे होत ते मिळाले. फलंदाजांनी धावा केल्या. दोन्ही सामन्यात आम्ही सगळ्यांच आघाड्यांवर चांगली कामगिरी केली, असे विराट म्हणाला.