कचरा

ठाण्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर

ठाण्यात कच-याचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढतंय. प्रत्येक चौकातल्या कचराकुंडीच्या बाहेर पडून कचरा ओसंडून वाहतोय...त्यामुळे ठाणेकर चांगलेच संतापलेत...

Apr 29, 2013, 07:35 PM IST

पुणे स्टेशनवर सर्वत्र घाणीचं साम्राज्य

देशाच्या कानाकोपऱ्यातून येणा-या आणि जाणाऱ्या 160 ट्रेन...त्यातून दररोज एक लाख प्रवाशांची ये-जा... हेरिटेज दर्जा लाभलेली मुख्य इमारत...अशा पुणे स्टेशनवर सध्या सफाई कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. मात्र प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. तर रेल्वे प्रशासनानं बघ्याची भूमिका घेतली आहे.

Sep 13, 2012, 09:20 PM IST

ठाण्यात युनिव्हर्सिटी नव्हे, कचरापट्टी!

ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाचं केंद्र उभारण्यासाठी महापालिकेनं वर्षभरापूर्वी जागा देऊनही अजून त्या ठिकाणी कामाला सुरूवात झाली नाही. उलट त्या जागेवर घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय.

Sep 11, 2012, 10:00 PM IST

अंबरनाथमधले सफाई कामगार संपावर

अंबरनाथ नगर पालिकेचे एक ते दीड हजार सफाई कर्मचारी सोमवार मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेले आहेत.

Feb 21, 2012, 11:39 PM IST

जयपूर महापालिकेत कचऱ्यावरून हाणामारी

जयपूर महापालिकेत कचऱ्याच्या मुद्यावरून चांगलाच हंगामा झाला. सुरूवातीला नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर मात्र या चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. लोकशाहीला लाज आणेल असा प्रकार जयपूर महापालिकेच्या सभागृहात घडला.

Feb 14, 2012, 09:17 AM IST

औरंगाबादेत घाणीचं साम्राज्य

ऐतिहासिक औरंगाबाद शहरात सध्या सगळीकडे घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे सामान्य माणसांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

Jan 22, 2012, 08:35 AM IST

पुण्यात कचऱ्याविरोधात आंदोलन

पुणे शहरात कचऱ्यावरून पुन्हा रणकंदनास सुरुवात झाली आहे. फुरसुंगी कचरा डेपोवरून नागरिकांनी उग्र आंदोलन सुरु केलं आहे. उरूळी देवाची आणि फुरसुंगीतील ग्रामस्थांनी कचरा डेपोविरोधात दंड थोपटले आहेत.

Dec 21, 2011, 11:29 AM IST