मुंबई : राज्यातील तीन महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आलीय. चंद्रपूर, लातूर आणि परभणी या महानगरपालिकेसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. 
 
 महापालिका निवडणुकीसाठी 27 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान अर्ज भरावा लागणार आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी 7 एप्रिलपर्यंतची मुदत असणार आहे. 
 
 8 एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. दुसरीकडे राज्यातील इतर महापालिकांमधील पोटनिवडुकांसाठीदेखील याचदरम्यान निवडणुका घेतल्या जाणार आहेत