मुंबई :  जोगेश्वरी इथं मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.. दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान गोविंदा पथक रिट याचिका दाखल करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोर्टानं पुन्हा सहानुभूतीपूर्वक विचार करुन दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती ते याचिकेतून करणार आहेत.. उत्सवावर निर्णय घेताना गोविंदा पथकाचे मत विचारात घ्यावे अशी विनंती ते या याचिकेतून करणार आहेत.


दहीहंडी उत्सव साजरा करताना सुरक्षेची सर्व हमी देण्यास आणि उत्सवाला कुठलंही गालबोट लागणार नाही, याची काळजी घेण्याची तयारी या मंडळानं दर्शवलीय. शिवाय गिनीज बुकात नोंद झालेला विश्वविक्रम परत करण्याची सध्या कोणतीही भूमिका नाही, असं स्पष्टीकरणही जय जवान गोविंदा पथकाकडून देण्यात आलंय.