धरमशाला : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे विराट कोहली खेळू शकत नाहीये. कोहलीच्या जागी अजिंक्य रहाणेकडे सामन्याचे नेतृत्व सोपवण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट सामन्यात जरी खेळत नसला तरी आज तो मैदानात उपस्थित होता तो वॉटर बॉयच्या रुपात. आपल्या सहकाऱ्यांना चीअर अप कऱण्यासाठी तो वॉटर बॉयच्या रुपात मैदानात उतरला.


उमेश यादवने सलामीवीर रेनशॉला बाद केल्यानंतर मैदानात सहाकाऱ्यांना चीअर अप कऱण्यासाठी स्वत: विराट पाण्याच्या बाटल्या घेऊन गेला.