प्रपोज वगैरे नाही, तुम्ही विचारही केला नसेल त्या कारणामुळं अजय देवगननं काजोलशी केलं लग्न 

अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे.

Updated: Apr 27, 2022, 02:15 PM IST
प्रपोज वगैरे नाही, तुम्ही विचारही केला नसेल त्या कारणामुळं अजय देवगननं काजोलशी केलं लग्न  title=

मुंबई : अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. जरी त्यांच्या लग्नाला 23 वर्षे झाली असली तरीही हे कपल आजही नव्या जोडप्या सारखं वावरताना दिसतं. 

लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा एका टॉक शोमध्ये काजोलशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला? असं अजयला या लग्नाबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने  यावर प्रतिक्रिया देत जे सांगितलं ते खूपच मजेदार आणि हृदयस्पर्शी आहे.

सुपरस्टार अजय देवगण त्याच्या आगामी 'रनवे 34' चित्रपटामुळे चर्चेत आहे. २९ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अजय खूप व्यस्त आहे. तो लोकांमध्ये चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.

दरम्यान, जेव्हा तो एका टॉक शोमध्ये पोहोचला तेव्हा त्याला विचारण्यात आलं की त्याने काजोलशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला. यावंर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे.  प्रपोज न करता हे दोघंही एकमेकांना आवडू लागले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

प्रपोज न करता घेतला लग्न करण्याचा निर्णय 
अजय देवगण म्हणाला- ''मला खरंच माहीत नाही..आम्ही कसे भेटलो, आमची चांगली मैत्री झाली. आम्ही प्रपोज न करता एकमेकांना डेट करायला लागलो आणि मग ठरवलं आम्ही लग्न करणार आहोत. आम्हा दोघांचे विचार करण्याची पद्धत सारखीच आहे.  त्यामुळे हा फ्लो पुढे चालूच राहिला."

एकत्र राहायला शिकलो
बोलता-बोलता अजय देवगणने कबूल केलं की इतरांप्रमाणेच त्यानेही आपल्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मात्र त्या समस्यांना मागे टाकून तो काम करायला शिकला आहे.