बाईकवरून पाठलाग, शिवीगाळ... प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

अभिनेता करण वाही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.मात्र नुकतीच अभिनेत्याने एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. जी पोस्ट पाहून त्याचे चाहते हैराण झाले आहेत. 

Updated: Feb 8, 2024, 11:58 AM IST
बाईकवरून पाठलाग, शिवीगाळ... प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार title=

मुंबई : टीव्ही शो आणि मालिकांमधून घरा-घरात पोहचलेला अभिनेता करण वाही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो तर कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. मात्र नुकतीच अभिनेत्याने एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. जी पोस्ट पाहून त्याचे चाहते हैराण झाले आहेत. एका अनोळख्या व्यक्तीने भर रस्त्यात अभिनेत्याला त्रास दिल्याचा असं अभिनेत्याचं म्हणणं आहे. नुकतीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्याने केवळ करणचा पाठलागच नाही केला तर तो खूप उद्धटपणे बोलला. करणचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये असं दिसतंय की स्कूटरवर बसलेली एक व्यक्ती करणचा पाठलाग करत आहे आणि त्याच्याशी शाब्दिक वादही घालत आहे. ही पोस्ट शेअर करत अभिनेत्याने लिहीलं आहे की. ''मी जोपर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत नव्हतो, तोपर्यंत तो माणूस माझा पाठलाग करत होता.  हा माणूस मी चूक केलीय असं म्हणतोय पण खरंतर यानेच माझ्या गाडीचा पाठलाग करत गाडीला धडक दिली. मुंबई पोलीस कृपया मला मदत करा. हा त्याची चूक मान्य करून हे प्रकरण थांबवत नाहीये.''

''ही व्यक्ती माझ्या मागे लागलीये. तू जेवढी मला शिवीगाळ केलीयस ना, तू थांब तुझ्याकडे आता पोलीसच येतील.'' या प्रकरणानंतर करणने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आणि लिहलं, ''माझ्याबरोबर जी घटना घडली त्याबाबत मी थोडक्यात सांगतो, माझ्यापुढे एक गाडी असल्याने मी लगेच उजव्या बाजूने ओव्हरटेक करत पुढे गेलो. या माणसाने मला शिवीगाळ केली आणि म्हणाला तू गाडी बाजूने काढलीच कशी? मग तो पुढे आला आणि म्हणाला की, तुझ्यासारखे अभिनेते खूप पाहिले आहेत मी.''

''मग मी त्याच्या स्कूटरची चावी घेतली आणि परत दिली व तिथून निघालो. मी पोलीस स्टेशनला पोहोचेपर्यंत त्याने माझा पाठलाग केला. तो शिवीगाळ करत मला म्हणाला की, त्याची पोलिसांत ओळख आहे आणि तो मला याबद्दल चांगलीच अद्दल घडवेल.'' मात्र या सगळ्या पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावरुन काढून टाकल्या आणि पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली आणि त्यामध्ये लिहीलं की, ''मी सुरक्षित आहे, मी घरी पोहोचलो आहे. पोलिसांशी माझं बोलणं झालंय. यावर तोडगा निघेल अशी आशा आहे. धन्यवाद मुंबई पोलीस.'' सध्या अभिनेत्याच्या या पोस्टने सगळीकडे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकजण काळजी व्यक्त करत आहेत.