Ranbir Kapoor सोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका नैराश्यात; सावरण्यासाठी कोण पुढे आलं माहितीये ?

रणबीरसोबतच्या  ब्रेकअपनंतर दीपिका नैराश्यात गेली होती. मात्र या नैराश्यातून तिला बाहेर काढण्यासाठी एका मित्राने पुढाकार घेतला.

Updated: May 5, 2022, 11:44 AM IST
Ranbir Kapoor सोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका नैराश्यात; सावरण्यासाठी कोण पुढे आलं माहितीये ?  title=

मुंबईः बॉलिवूडमधल्या रिलेशन्सची आणि ब्रेकअपची नेहमीच चर्चा होते. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर या दोघांच्या नात्याचीही बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा झाली.

एक काळ असा होता की दीपिका पदुकोणला पाहून रणबीर कपूर वेडा झाला होता. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. हे दोन्ही स्टार्स लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात होते.

दीपिका रणबीरसोबतच्या नात्याबद्दल खूप गंभीर होती. तरीही हे नाते फार काळ टिकलं नाही, शेवटी दीपिका पदुकोणला रणबीर कपूरसोबत ब्रेकअप करावं लागलं. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपचीही इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरने कतरिना कैफसाठी दीपिकाला सोडल्याचं बोललं जातं. इतकंच नाही, त्या दोघांना दीपिकाने रंगेहातही पकडलं होतं.

याच कारणामुळे रणबीर आणि दीपिका कायमचे वेगळे झाले. मात्र या ब्रेकअपनंतर दीपिका नैराश्यात गेली होती. मात्र या नैराश्यातून तिला बाहेर काढण्यासाठी एका मित्राने पुढाकार घेतला.

हा मित्र दुसरा-तिसरा कोणी नसून स्वतः रणबीरच होता...'मित्र' म्हणून रणबीर तिच्‍या मदतीसाठी पुढे आला आणि तिला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली.

दीपिकाने स्वत: हे एका मुलाखतीत सांगितलं होतं.रणबीर आणि दीपिकाचे ब्रेकअप झाले असले तरी ते दोघे अजूनही चांगले मित्र आहेत. आजही दीपिका-रणबीर एकमेकांना भेटतात. 

दीपिका लवकरच शाहरुख खानसोबत 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात आलिया आणि अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे.