लागिरं झालं जी : अज्या सिक्रेट मिशन शितलीपासून लपवू शकेल का?

मुंबई : लागिरं झालं जी या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या १५ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात भय्यासाहेबांपासून झाली. भय्या साहेब आपल्या कार्यालयात पोचतात आणि बघतात तर जयडी त्यांच्या आधीच येऊन त्यांची वाट बघत बसलेली असते. तिला बघून भय्या जयडीला विचारतात एवढ्या सकाळ सकाळ याचे कारण काय? तेव्हा तिच्याकडून कळते अज्या मिशनवर जाणार आहे, ते ऐकून भय्या साहेब जाम खुश होतात. पण जयडी मात्र ना खुश दिसते. जयडीच्या बोलण्यातून अज्या बद्दलचा राग हळू हळू बाहेर पडू लागतो आणि ती म्हणते तो एवढ्यात मारायला नको, कारण जे मी दुःख सहन केले आहेत ते त्याच्याही वाट्याला आले पाहिजेत.

शीतलचा अज्या बद्दलचा राग पाहून भय्या अजूनच खुश होतात. दुसरीकडे अज्याला आणि इतर सैनिकांना भेटायला कर्नल येणार असल्यामुळे अज्या शीतलाल मेसेज करून आपला फोन बंद करून टाकतो आणि इकडे अज्याचा मेसेज पाहून खुश झालेली शीतल लगेच अज्याला फोन लावते, पण मेसेज येताच फोन बंद झाला या काळजीने शीतल पुन्हा अज्याच्या काळजीने बेचैन होते. तिला बेचैन झालेली पाहून यास्मिन तिच्या बेचैनीचे कारण विचारते. दरम्यान आर्मी बेस कॅम्पमध्ये अज्या दुश्मनावर कशी चढाई करायची याचा मास्टर प्लॅन सांगतो. त्याने सांगितलेला प्लॅन कर्नल व सर्व जवानांना फार आवडतो. काही वेळाने अज्या मिशनवर जाण्याची तैयारी करत असताना त्याचा एक जवान मित्र येऊन त्याला घरी फोन कर असे सांगतो, पण अज्या काही घरी फोन करत नाही.

तिकडे शीतल मात्र अज्याच्या काळजीने हैराण झालेली असते. रात्री तिला अज्याच्या आठवणीने व काळजीने झोपच लागत नाही. तिकडे अज्याला आणि इतर जवान मिशनवर जाऊन आपले मिशन पूर्ण करतात आणि दुश्मनांनी पकडलेल्या आपल्या जवानाला सोडवून आणण्यात यशस्वी होतात. मिशनवरून आल्यावर अज्या शीतलला फोन करून त्याने फत्ते केलेल्या मिशाबद्दल सांगेल की सारे गुपितच ठेवेल ? हे पाहण्यासाठी लागिरं झालं जी या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.