पहिल्या प्रेमात मिळाला धोका..., नंतर करोडपती निर्मात्याशी केलं विद्या बाललनं लग्न

Vidya Balan : विद्या बाललनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या एक्सनं तिला कसा धोका दिला होता याचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 13, 2024, 05:37 PM IST
पहिल्या प्रेमात मिळाला धोका..., नंतर करोडपती निर्मात्याशी केलं विद्या बाललनं लग्न title=
(Photo Credit : Social Media)

Vidya Balan : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. विद्या बालन वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते, कधी तिचे चित्रपट तर कधी तिचं खासगी आयुष्य. याशिवाय विद्या तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी देखील ओळखली जाते. सध्या विद्या ही तिच्या 'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.  या दरम्यानच, विद्या बालननं तिच्या पहिल्या प्रेमाविषयी एक खुलासा केला आहे. कशा प्रकारे तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं तिला धोका दिला होता. 

विद्या बालननं नुकतीच इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली होती. यावेळी तिच्या भूतकाळाविषयी काही गोष्टींना घेऊन प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी विद्यानं तिच्या पहिल्या प्रेमाविषयीच म्हणजेच बॉयफ्रेंडविषयी एक मोठा खुलासा केला. विद्या म्हणाली, माझ्यासोबत खूप मोठा धोका झाला. मी पहिल्यांदा कोणत्या मुलाला डेट करत होते आणि त्याच मुलानं मला मोठा धोका दिला. मला आजही आठवण आहे की आमचा ब्रेकअप झाला होता आणि व्हॅलेन्टाईन डे ला त्याला कॉलेजमध्ये भेटली होती. त्यानं मला वळून सांगितलं की तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला भेटायला जात आहे. हे ऐकल्यानंतर मला खूप जास्त वाईट वाटलं. त्याशिवाय मी माझ्या आयुष्यात खूप चांगली काम देखील केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विद्या बालन विषयी बोलायचे झाले तर तिनं बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरचा मोठा भाऊ आणि चित्रपट निर्माता सिद्धार्थ कपूरशी लग्न केलं. ते दोघं गेल्या अनेक वर्षांपासून आनंदी आयुष्य जगत आहेत. एका मुलाखतीत विद्यानं तिच्या आणि सिद्धार्थ रॉय कपूरच्या लव्ह स्टोरी विषयी सांगितलं आहे. विद्या म्हणाली, "हे समोर यावं अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. त्याच काळात पापाराझी हा ट्रेंड सुरु झाला होता. मला आजही आठवण आहे की आमच्या काही डेट्स या गाडीत झाल्या होत्या. आम्ही इथे-तिथे गाडीनं फिरायचो. तो काळ खूप सुंदर होता आणि मला यात मज्जा देखील यायची. कारण यात प्रायव्हसी देखील आहे. त्याचा मी पूर्ण आनंद घेतला." 

हेही वाचा : शहनाज आणि एल्विशचा 30 सेकंदाचा तो व्हिडीओ पाहून चाहते हैराण, दोघांना एकत्र पाहताच म्हणाले...

विद्या बालनचा आगामी चित्रपट दो और दो प्यारविषयी बोलायचे झाले तर 19 एप्रिलला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ती तिच्या लोकप्रिय ठरलेल्या भूल भुलैया या चित्रपटाची फ्रेन्चायझी 3 मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.