....यामुळं विराटसोबत केलं लग्न, दीड वर्षानंतर अनुष्काचा खुलासा

आताच्या अधुनीक युगात प्रत्येक मुलगी लग्नाआधी आपल्या करियरचा विचार करतात.

Updated: Jul 16, 2019, 05:45 PM IST
....यामुळं विराटसोबत केलं लग्न, दीड वर्षानंतर अनुष्काचा खुलासा title=

मुंबई : आताच्या अधुनीक युगात प्रत्येक मुलगी लग्नाआधी आपल्या करियरचा विचार करतात. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने वयाच्या २९व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सोबत लग्न केले आणि आपल्या सुखी संसाराला प्रारंभ केला. त्यांच्या लग्नाला जवळपास दीड वर्ष पूर्ण झाले आहे. इटली मध्ये त्यांनी निकटवर्तीयांसमक्ष लग्न गाठ बंधली. नुकताच फिल्मफेअरला दिलेल्या मुलखतीत अनुष्काने तिच्या लग्नासंबंधीत काही खुलासे केले आहेत.

फिल्मफेअर सोबत संवाद साधताना, अनुष्काला तिच्या लग्नासंबंधीत काही प्रश्न विचारण्यात आले. २९व्या वर्षी बहुतेक अभिनेत्री फक्त त्यांच्या करियरचा विचार करतात. पण तू २९व्या लग्न केलेस? करियर आणि लग्न यांच्या मधील फरक पटवून देत अनुष्का म्हणाली की, 

'काही लोकांची अशी समज आहे की, एका अभिनेत्रीने २९व्या वर्षी लग्न करने योग्य नाही. चाहते कलाकारांना फक्त टीव्हीवर पाहातात. त्यांना कलाकारांच्या खासगी आयुष्यात काही रस नसतो. मग त्या अभिनेत्रीचे लग्न झालेले असो, नाहीतर ती आई असो. आता या मानसीकतेतून बाहेर पडणे काळाची गरज आहे.'

लग्न हे एक नैसर्गिक बंध असल्याचे सांगत अनुष्का म्हणाली की, 'आधी मी प्रेमात होती, आणि आता मी प्रेम बंधनात अडकली आहे. लग्न एक नैसर्गिक गोष्ट आहे. जी दोन लोकांच्या नात्याला अधिक मजबूत करते.' आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत हे दोघे नेहमी एकमेकांना वेळ देत असतात.