मीठाचे पाणी पिण्याचे '५' जबरदस्त फायदे!

मीठाचे पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला ठाऊक आहेत?

Updated: Jul 13, 2018, 01:35 PM IST
मीठाचे पाणी पिण्याचे '५' जबरदस्त फायदे! title=

मुंबई : पाणी पिण्याचे फायदे तर तुम्ही जाणताच. पण पाण्यात मीठ घालून प्यायल्यास खूप फायदा होतो. पण रिफाईंड मीठ न वापरता नैसर्गिक मीठ वापरणे अधिक फायद्याचे ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात. तर जाणून घेऊया मीठाचे पाणी पिण्याचे फायदे...

पचनशक्ती सुधारते

पोटासाठी मीठाचे पाणी अतिशय फायदेशीर ठरते. रोज सकाळी मीठाचे पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. पोटांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

हाडे बळकट होतील

मीठाचे पाणी प्यायल्याने हाडे बळकट होतात. कारण मीठामुळे शरीराला कॅल्शियम मिळते. 

बॅक्टेरिया होतील नष्ट

बॅक्टेरिया शरीरात आजार पसरवतात. मीठात अॅंटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम मीठाच्या पाण्यामुळे साध्य होईल.

त्वचा उजळेल

मीठाचे पाणी प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होते. त्वचेवरील काळे डाग, पिंपल्स दूर होतात. त्याचबरोबर त्वचा उजळ होण्यास मदत होते.

लिव्हर स्वस्थ राहण्यासाठी

लिव्हर शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्याचे कार्य करतं. आणि टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मीठाचे पाणी उपुयक्त ठरतं. 

नोट- गरजेपेक्षा अधिक प्रमाणात मीठाचे पाणी पिणे नुकसानकारक ठरेल.