जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines

Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 24, 2023, 12:01 PM IST
जगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines  title=

Gold Mines in India : भारतात पूर्वी सोन्याच्या खाणी होत्या असे सांगितले जात होते. सोन्याचा धूर निघत होता, असेही सांगितले जाते. सोने हा जगातील मौल्यवान धातूंपैकी एक आहे. हे जगभरातील अनेक देशांतमध्ये सोने आढळते. या देशांच्या यादीत भारताचेही नाव आहे. चीनमध्ये सर्वाधिक सोने उत्खनन केले जाते. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी सोन्याचा शोध लागला. जगभरात सोन्याला खूप मागणी आहे. त्यामुळे सोने उत्खनन केले जात आहे. दरवर्षी जमिनीतून किती सोने बाहेर काढले जाते, ते जाणून घ्या.

सोने हे पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात जुन्या धातूंपैकी एक आहे, असे शास्त्रज्ञ आणि इतिहासकार सांगतात. जगभरात सोने हे केवळ धातू नसून ते आर्थिक समृद्धीचे प्रतीक आहे. आज आम्ही तुम्हाला भारतात कोणत्या ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत हे सांगत आहोत. अनेकांना माहीत आहे की, एक काळ असा होता जेव्हा भारताला 'गोल्डन बर्ड' म्हटले जायचे आणि असे म्हणण्याची अनेक कारणे होती. मिळालेल्या माहितीनुसार, इराणचा शासक नादीर शाह याने 1939 मध्ये दिल्लीवर हल्ला केला तेव्हा त्याने इतके सोने लुटले की तीन वर्षे तेथे कोणालाही कर भरावा लागला नाही.

जगात आतापर्यंत सुमारे 2 लाख टन सोने काढले

सम्राट शाहजहानने स्वतःसाठी एक सोन्याचे सिंहासनही बांधले, ज्याला 'तख्त-ए-तौस' असे म्हणतात. इंग्रजांनीही भारतातून भरपूर सोने लुटले. यावरुन आपल्या देशात भरपूर सोने असल्याचे स्पष्ट होते. आजही भारतात अनेक ठिकाणाहून सोने काढले जाते. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, जगात सोन्याची खाण सुरु झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2 लाख टन सोने काढण्यात आले आहे.

भारतात इतके सोने काढले जाते?

देशात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन कर्नाटकात होते. येथील तुम्ही कोलार सोन्याच्या खाणीबद्दल ऐकले असेल. याशिवाय हुट्टी गोल्ड फिल्ड आणि उटी नावाच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. याशिवाय आंध्र प्रदेश आणि झारखंड राज्यातील हिराबुद्दिनी आणि केंद्रुकोचा खाणींमधूनही मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन केले जाते. या खाणींद्वारे, देशात वार्षिक 774 टन सोन्याच्या वापराच्या तुलनेत सुमारे 1.6 टन सोन्याचे उत्खनन केले जाते जाते. तर जगभरात दरवर्षी 3 हजार टन सोने खाणीतून बाहेर काढले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार आपल्या देशातील महिलांकडे 21 हजार टन सोने आहे, जे खूप जास्त आहे. जगातील पहिल्या 5 बँकांकडेही इतका सोन्याचा साठा नाही. सहसा हा मौल्यवान धातू एकटा किंवा पारा किंवा चांदीसह मिश्रधातूच्या स्वरुपात आढळतो. याशिवाय कॅल्व्हराइट, सिल्व्हनाइट, पॅटझाइट आणि क्रेनराईट धातूंच्या स्वरुपातही सोने आढळते.