बीडमध्ये वीज कोसळून पाच जण ठार

बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात चारदारी गावात वीज पडून पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय.. तर अन्य पाच जण जखमी झालेत. 

Updated: Oct 7, 2017, 08:05 PM IST
बीडमध्ये वीज कोसळून पाच जण ठार title=

बीड : बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात चारदारी गावात वीज पडून पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय.. तर अन्य पाच जण जखमी झालेत. 

चारदारी येथील घागर वाडा माळावर एका झाडाखाली बसले असता दहा जणांवर वीज कोसळलीये.. यात पाच जण ठार झालेत तर पाच जखमी झालेत. आसाराम रघुनाथ आघाव(२८), उषा आसाराम आघाव (२५), दिपाली मच्छींद्र घोळवे (२१), शिवशाला विठ्ल मुंडे (२१), वैशाली संतोष मुंडे (२५) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 

तर सुमन भगवान तिडके (४५), रुक्मीण बाबासाहेब घोळवे (५२), कुसाबाई नामदेव घोळवे (४५), सिताबाई दादासाहेब घोळवे (२५), सुरेखा आबासाहेब आघाव (१७)  हे पाच जण जखमी झाले आहेत .जखमीव धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

जखमींना नजीकच्या रुग्णालयात भरती करण्यात आलंय.. त्याचबरोबर माजलगाव तालुक्यातील लोणगाव शिवारातही वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालाय.

रायगडमध्येही वीज कोसळून दोन ठार

रायगड जिल्ह्यात दोन युवकांचा वीज पडून जागीच मृत्यू झालाय..जोरदार पाऊस सुरु झाल्यानं झाडाखाली थांबले असता या झाडावरच वीज कोसळली.. त्यामुळे हे दोन युवक जागीच मृत्यूमुखी पडलेत.. रायगडच्या महाड तालुक्यातील कुर्ले गावातील ही घटना आहे.. जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरु आहे..