मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, आझाद मैदानात 20 जानेवारीपासून जरांगेंचे आमरण उपोषण

Maratha Reservation: आता आरक्षणाशिवाय माघार नाही. 20 जानेवारी मुंबई गाठणार असल्याचे जरांगे म्हणाले. 

Updated: Dec 23, 2023, 05:27 PM IST
मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, आझाद मैदानात 20 जानेवारीपासून जरांगेंचे आमरण उपोषण title=

Maratha Reservation: सरकारने आता आंतरवालीसार पुन्हा वेगळा प्रयत्न करू नका, एकदा तुम्ही प्रयत्न केलात,त्याचे परिणाम तुम्ही बघितलेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. बीड येथे झालेल्या भव्य सभेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकार, छगन भुजबळ यांच्यावर टिका केली. आता आरक्षणाशिवाय माघार नाही. 20 जानेवारी मुंबई गाठणार असल्याचे जरांगे म्हणाले. बीडच्या सभेत जरांगेनी मोठा निर्णय घेतलाय. येथेच ते पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. आझाद मैदानात 20 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत. 

यांनी यांचेच हॉटेल जाळले अन निष्पाप मराठ्यांना मध्ये टाकले. निष्पाप पोरांना अडकविण्याचे षडयंत्र सरकारने केले. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती, सरकार झोपू नका. मराठ्यांना राज्यात शांतता हवीय, त्यांना हुसकवू नका. ते कधीच जाळपोळ करू शकत नाहीत, असे जरांगे म्हणाले. ते येवल्याच येडपड,त्याचाच सरकार ऐकतय, ते सोबत बाजाराची पिशवी घेऊन हिंडते,त्यात कागद, मग कशाला बोंबलतो रे मग? अशा भाषेत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. तुला म्हटलं होतं नको नादी लागू. मी लई बेकार आहे, आता कसा बारीक आवाज बोलतो. जरांगे साहेब म्हणतो असे जरांगे म्हणाले. मी म्हणलं डंगराला कशाला बोलायचं,पण हे येडपट बोलते, मग आपण सोडत नसतो, जर कुणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर त्याला सुट्टी नाही, असे भाषेत त्यांनी भुजबळांवर टीका केली. 

शासनाला माझी विंनती आहे, येथे हजारो माता मावल्या लेकरांना घेऊन उन्हात बसल्यात.आमची एकच मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण, सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. भुजबळांचे ऐकू नका. प्रत्येक राज्यातील मोठी जात असलेला समुदाय संपविण्याचा तुम्ही घाट घातलाय. पण सगळ्यांनी ठरवलं तर तुमचा सुपडा साफ होईल असे ते म्हणाले. 

मग चला 20 जानेवारीला मराठे मुंबईत येणार. मुंबई आंदोलनाची तारीख 20 जानेवारी ठरली, असे जरांगेंनी सांगितले. मुंबईत शांततेत जायचं अन शांततेत जायचं शांततेत यायचं. मराठा समाजाने लक्ष ठेवा. कुणी जर धिंगाणा करायला लागला,गाडी पेटवायला लागला,तर जाग्यावर धरून पोलिसांकडे न्यायचं, असे आवाहन त्यांनी केले. ज्या मराठ्यांच्या नोटिसा दिल्या त्यांना एकट पडू देऊ नका. मराठा आमदार खासदार आणि मंत्री यांना हात जोडून विंनती करतो. मराठ्यांच्या पोरांच्या पाठीमागे उभे रहा, नाहीतर मराठ्यांचे घर तुमच्यासाठी बंद राहतील. एकदा जर आम्ही गाव सोडलं तर चर्चा बंद, आम्ही आरक्षण घेऊनच येऊ असे ते यावेळी म्हणाले.

महत्वाचे मुद्दे 

तुम्ही आता पुन्हा वेगळा प्रयत्न करू नका, एकदा तुम्ही प्रयत्न केलात,त्याचे परिणाम तुम्ही बघितलेत. आरक्षण मिळविण्याची एवढीच संधी,संधीच सोन करा. आपल्या कुणबीच्या नोंदी सापडल्यात. मला हे दुश्मन समजतायेत,सरकार मराठ्यांची फसवणूक करतेय, सरकारला वठणीवर आणल्याशिवाय आता सुट्टी नाही द्यायची. जे आपल्या लेकरांच्या सोबत तोच आपला. आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर चपलाने हाणा, किती दिवस आमचं रक्त पिणार? आमचे मुडदे पडतांना तुम्हाला लाजा वाटत नाहीत, तुम्हाला मराठा जात संपवायची,पण मराठा जात संपणार नाही असे ते म्हणाले.