पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्राच्या जनतेला विशेष आवाहन

पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Updated: Oct 13, 2020, 12:24 PM IST
पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्राच्या जनतेला विशेष आवाहन title=

नवी दिल्ली : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही थांबवण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेला विशेष आव्हान केलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्राच्या लोकांना एक गोष्ट विशेषपणे सांगू इच्छित आहे. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. महाराष्ट्रात हे संकट जरा अधिक आहे. त्यामुळे माझं महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला प्रार्थना आहे की, चेहऱ्यावर मास्क, पुन्हा-पुन्हा हात धुणे, स्वच्छता ठेवणं, सोशल डिस्टंसिंग या नियमांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. जोपर्यंत औषध नाही, तोपर्यंत निष्काळाजीपणा नाही. ही लढाई नक्की जिंकू. जिंकायचीच आहे आणि जिंकणारच.'

भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचं प्रकाशनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्या कामाचं कौतूक केलं.

डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.