कीटकनाशक फवारणीमुळे आणखी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे आणखी दोघांचा बळी गेला आहे.

Updated: Oct 14, 2017, 06:05 PM IST
कीटकनाशक फवारणीमुळे आणखी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू  title=

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे आणखी दोघांचा बळी गेला आहे. विषबाधेमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२ झाली आहे. गजानन हणमंतू नैताम आणि मधुकर बावणे असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

गजानन हे झरीजामनी तालुक्यातील माथर्जुन येथील शेतकरी ११ ऑक्टोबरला शेतात कीटकनाशक फवारणीस गेले. त्यांनंतर घरी परतल्यावर त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. त्यांना पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे मधुकर बावणे यांचाही विषबाधेने मृत्यू झाला.