मंत्रालयाला मुंबई पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड

स्वच्छ अभियान राबवणाऱ्या मंत्रालयालाच मुंबई महापालिकेनं १० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 30, 2017, 10:31 PM IST
मंत्रालयाला मुंबई पालिकेने ठोठावला १० हजारांचा दंड title=

मुंबई : स्वच्छ अभियान राबवणाऱ्या मंत्रालयालाच मुंबई महापालिकेनं १० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

ओला आणि सुका कचरा

ओला आणि सुका कचरा असं वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यानं हा दंड ठोठावण्यात आलाय. 

कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा हवी

मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या रहिवाशी सोसायट्या, व्यावसायिक इमारती, कार्यालयं आणि हॉटेल्सनं ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करुन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी असे आदेश महापालिकेनं काढले होते.

दुर्लक्ष केल्याने दंड

मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही मंत्रालयातून काहीच हालचाली न झाल्यानं अखेर हा १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.