.. अन्यथा निर्बंध कठोर होणार, आरोग्यमंत्र्यांचा इशारा

मागील ७ दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा डबल 

Updated: Dec 29, 2021, 01:06 PM IST
.. अन्यथा निर्बंध कठोर होणार, आरोग्यमंत्र्यांचा इशारा  title=

मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय. कोरोनाची तिसरी लाट मुंबईच्या उंबरठ्यावर असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला नव्या नियमांची माहिती दिली. राज्याला आठ दहा दिवसात २० जानेवारीपर्यंत ५ ते ६ हजार ऍक्टिव्ह रुग्ण होते. मात्र आता ११ हजार ०९२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज संध्याकाळी अंदाजे २२०० रुग्ण होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 

मागील ७ दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा डबल झाले आहे. मुंबईत रोज ५१ हजार चाचण्या केल्या जात आहेत. यात २२०० पॉझिटिव्ह आले तर ४ टक्के पॉझिटीव्हीटी रेट मुंबईचा जात आहे. असं असेल तर चांगल नाही, काळजी घेण्याची गरज आहे, असं देखील यावेळी राजेश टोपे म्हणाले. 

दिल्लीने कडक निर्बंध लावले आहेत.  आपल्याकडे या गोष्टी सहजासहजी घेतल्या तर त्याची किंमत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल.  नियम पाळावे लागतील अन्यथा निर्बंधात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा देखील यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री, टास्क फोर्स एकत्रित घेतील असं देखील टोपे यावेळी म्हणाले. 

तातडीने टास्क फोर्सची बैठक घेतली जाईल. तसेच ओमायक्रॉन १६७ आहेत, ९१ डिस्चार्ज झालेत, मृत्यू नाही हे दिलासा देणारी बाब आहे, असं देखील टोपे यावेळी बोलले.  पण त्यापेक्षा विविध व्हेरियंट आढळतायत आणि रुग्ण संख्या वाढतेय ही चिंतेची बाब आहे. 

तसेच लग्न समारंभात गर्दी होते, त्यावर कारवाई करण्याची गरज आहे.   लसीकरणाचा ८ लाखाचा प्रतिदिन दर आज ५ लाखावर आलाय. यासाठी सगळ्यांना एकत्र येऊन लसीकरणाबाबत नकारात्मकता असेल तर ती बदलून गती घेण्याची गरज आहे
- देशाच्या लसीकरण दरापेक्षा आपण थोडे मागे आहोत, अशी माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली. 

लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, पण राहिलेल्या लोकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, त्यासाठी स्थानिक नेतृत्व आणि प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. ८७ टक्के पहिले डोस झाले आहेत. चांगले करू शकलो तर १० दिवसच्या आत पहिला डोस संपेल. दोन्ही डोस झालेले ५७ टक्के आहेत

ओमायक्रॉनच्या संदर्भात प्रोटोकॉल ठरलेले आहेत, हाय रिस्क देशातून येणार्‍यांचे स्क्रीनिंग सुरू आहे. पंतप्रधानांनी घोषणा केली १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थींना लसीकरण करायचे आहे.  कोव्हॅकसिन देण्याचा निर्णय झालाय.  शाळेत जाऊन देता येईल का याचा विचार सुरू आहे, अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. 

- गर्दी टाळावी लागेल, मग ती वाहतूक, लग्न, पार्टी यातील असो. आपल्याला निर्बंध पाळावे लागतील असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे. क्वारंटाईन कालावधीबाबत icmr जे सांगेल ती पूर्व दिशा असते. त्यामुळे त्यांचे नियम पाळणे महत्वाचे आहे. 

डबलिंग रेट एवढ्या झपाट्याने वाढत असेल तर काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकारची टीमही दोन ते तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर आहे. बेड, हॉस्पिटल्स, स्टाफ या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार तयारीत आहे. दिवसाला ७०० मेट्रीक टनपर्यंत ऑक्सिजनचा वापर वाढला की आपण लॉकडाऊन करतो. आज ऑक्सिजनची गरज लागत नाही असं चित्र आहे, पण रुग्ण वाढतायत ही चिंतेची बाब आहे. 

राजेश टोपे शाळांबाबत काय म्हणाले?

- शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याचं कळलंय 
- अहमदनगरला जे झालंय ते केस स्टडी म्हणून विचार केला जाईल
- पॉझिटिव्ह झाले तरी मुलांचा आजार बळावत नाही, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते 
- याबाबत मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करून दोन दिवसात शाळांबाबत निर्णय घेतला जाईल