'...त्यांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत'

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Updated: Sep 27, 2017, 05:28 PM IST
'...त्यांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत' title=

मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांना निवडणुकीत शिवाजी महाराजांची आठवण येते. महाराज मातृभक्त होते. कुपोषणानं मृत्युमुखी पडणाऱ्या मातांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुखांनी तोफ डागली.

आझाद मैदानात अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. लोकशाहीच्या नावाने सरकारची ठोकशाही खपवून घेणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचे मंत्री काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. माता-भगिनींची झोप उडवून स्वप्न कसली बघता, असा सवाल त्यांनी केलाय.