बाळासाहेब गहिवरले... डोळ्यांत आलं पाणी...

मुंबई : शिवतिर्थावर सेनेचा ४७ वा दसरा मेळावा | आज पुन्हा शिवतिर्थावर वाघाची डरकाळी... व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाळासाहेबांचा शिवसैनिकांशी संवाद

Updated: Oct 24, 2012, 09:44 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई : शिवतिर्थावर सेनेचा ४७ वा दसरा मेळावा | आज पुन्हा शिवतिर्थावर घुमली वयानं थकलेल्या एका वाघाची डरकाळी |

- व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाळासाहेबांचा शिवसैनिकांशी संवाद
- शिवसैनिकांना प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा होती - बाळासाहेब ठाकरे
- मला बोलताना धाप लागतेय | अशी परिस्थिती असताना मी तुमच्याशी बोलायचं तरी काय ? – शिवसेनाप्रमुख
- माझं ह्रद्य तुमच्यापाशीच - बाळासाहेब ठाकरे |
- बाळासाहेब गहिवरले... डोळ्यांत आलं पाणी
- वृद्धत्वानं थकलेल्या बाळासाहेबांचा स्वरानं शिवसैनिकही झाले भावूक
- मंत्रालयाला आग लागली बरं झालं... फाईल जळाली, भानगड मिटली - बाळासाहेब ठाकरेंचा टोला
- मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे हे विसरू नका – शिवसेनाप्रमुख
- सुशीलकुमार शिंदे, शरद पवार ही बेताल माणसं – शिवसेनाप्रमुख
- आसाममधील बांग्लादेशींना बाहेर काढा | जात नसतील तर गोळ्या घाला - बाळासाहेब
- मी घराणेशाही तुमच्यावर लादलेली नाही | मला सांभाळलंत, माझ्यानंतर आता उद्धव आणि आदित्यला सांभाळा - शिवसैनिकांचं भावनिक आवाहन

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फटकारे या पुस्तकाचं प्रकाशन | फटकारे हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा संग्रह | शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं शिवसैनिकांना अभिवान आणि संबोधन | उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर शिवसैनिकांना दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा |
- दररोज कुणाचं न कुणाचं वस्त्रहरण करण्याची सध्याची फॅशन - उद्धव ठाकरे
- महागाईनं रावणाचीही केली पंचाईत - उद्धव ठाकरे
- गॅसच्या किंमती एवढ्या वाढल्यात की सर्वसामान्य माणसाला जगावं कसं हेच कळत नाही - उद्धव ठाकरे
- चूल विझली तर सामान्य माणूस पेटून उठेल |
- मराठी, मुंबई आणि हिंदुत्वाची बाजू घेणं कधी सोडणार नाही - उद्धव ठाकर
- भूखंड सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची बाजू घेणार नाही - उद्धव
- उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनाम हे फक्त नाटक | खरंच राजीनामा दिला असता तर त्या पदावर दुसऱ्याची नेमणूक झाली असती |
- रॉबर्ट वडेरांसाठी सर्वांचाच आटापिटा |
- लवासासाठी शरद पवारांनी प्राण पणाला लावलेत - उद्धव ठाकरे
- गिरणी कामगारांची अजुनही केवळ पायपीट सुरू | त्यांच्यासाठी का नाही धोरण बदललं? - उद्धव
- गिरणी कामगारांची घरं म्हणजे छळछावण्या झाल्यात | पोलिसांचीही वेगळी परिस्थिती नाही
- मराठी माणसाच्या मुळावर याल तर नरडी घोटू |