मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाण्यात सुट्टी ?

लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सहाव्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात खासगी आस्थापनावरील संस्था, हॉटेल, मॉल यांनी आपल्या कर्माचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर करावी, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 23, 2014, 04:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
मुंबई, ठाण्यात गुरुवारी लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदान होतंय. लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सहाव्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात खासगी आस्थापनावरील संस्था, हॉटेल, मॉल यांनी आपल्या कर्माचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर करावी, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
आपला राष्ट्रीय हक्क बजावता यावा यासाठी खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी. किंवा मतदान करण्यासाठी किमान सवलत द्यावी, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी खासगी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे म्हणून सूचना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुट्टी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, मुंबई, ठाण्यात गुरुवारी लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदान होतंय. पण, याआधीच आपली नावं मतदार यादीत आहेत की नाहीत याबद्दल नागरिकांनी आत्ताच खात्री करून घेण्याचं आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केलंय.
मुख्य म्हणजे, तुमची नावं निवडणूक यादीत नसतील तरी तुम्हाला मतदानाच्या दिवशी नावनोंदणी करून मतदान करता येईल, असा खोटा प्रचार सध्या विविध सोशल माध्यमांतून करण्यात येतोय, तो धादांत खोटा असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे, जागो ग्राहक जागो... आणि मतदानापूर्वीच आपलं नाव मतदान यादीत असल्याची खात्री करून घ्या... या यादीत आपलं नाव नसेल तर याची ताबडतोब माहिती निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवा, असे कळविण्यात आलेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.