अनेक आजारांवर रामबाण 'वाटर थेरपी'

'वाटर थेरपी; म्हणजेच जलउपचार पद्धत, यात आतड्यांचं शुद्धीकरण केलं जातं, हा उपचार घरच्या घरी करता येतो, यासाठी याला शून्य खर्च येतो, जपानमध्ये 'वाटर थेरपी' प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

Updated: Nov 9, 2015, 07:05 PM IST
अनेक आजारांवर रामबाण 'वाटर थेरपी' title=

मुंबई : 'वाटर थेरपी; म्हणजेच जलउपचार पद्धत, यात आतड्यांचं शुद्धीकरण केलं जातं, हा उपचार घरच्या घरी करता येतो, यासाठी याला शून्य खर्च येतो, जपानमध्ये 'वाटर थेरपी' प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

पोटाच्या आतड्याचं शुद्धीकरण करणारी थेरपी
वाटर थेरपीमुळे चयापचाला वेग येतो, आतडे धुवून निघतात, लठ्ठपणा झटपट कमी होतो. त्वचा अधिक तेजस्वी दिसते, अनेक आजार आटोक्यात आणण्यास वाटर थेरपी फायदेशीर ठरते.

ही थेरपी करण्यासाठी तुम्हाला काही साध्या-सोप्या गोष्टी करायच्या आहेत.

जपानमध्ये वाटर थेरपी सुरू करतांना, मॉर्निंग वाक केल्यानंतर लगेच पाणी पितात, मॉर्निग वाक न करताही सकाळी उठल्यानंतर पाणी प्या, म्हणजेच जलउपचार पद्धतीला सुरूवात होते. काही वैद्यकीय चाचण्यांवरून जलोपचार म्हणजेच आतड्यांच्या शुद्धीकरणाला महत्वप्राप्त झालं आहे.

दुर्धर, दुर्मिळ आजार, नवीन रोग नियंत्रणात आणण्याची क्षमता जलशुद्धीकरणात आहे. जपानीज मेडिकल सोसायटीला यात १०० टक्के यश आलं आहे.

खालील आजारांवर वाटर थेरपी प्रभावी
डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, संधीवात, ह्दयाचे जलद ठोके, मिर्गी-अपस्मार, लठ्ठपणा, दमा, टीबी, मेंदुच्या बाहेरील दाह, किडनी, मुत्राशयाचे आजार, उलट्या, जठराची सूज, जुलाब, अपचन, मूळव्याथ, मधूमेह-डायबेटीस, बद्धकोष्ठता, डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे आजार, कॅन्सर, मासिक पाळींचा आजार, कान-नाक आणि घशाचा आजार यावर जलशुद्धीकरण पद्धती प्रभावी ठरली आहे.

अशी सुरू करा 'वाटर थेरपी'
१) सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याआधी कमीत कमी अर्धा लीटरच्या वर पाणी प्या. मात्र त्याचं प्रमाण एकावेळेस ६०० मिलीपेक्षा जास्त ठेऊ नका. हे प्रमाण पहिल्या दिवसापासून हळूहळू वाढवा, म्हणजे पहिल्या दिवशी एक ग्लास, तिसऱ्या दिवशी दोन ग्लास याप्रमाणे.. पाण्यात फ्लुओराईडचं प्रमाण नको, पाण्यात फ्लुओराईडचं नाही याची खात्री करा, म्हणजेच शुद्ध पाण्याचा वापर करा.

२) पाणी पिल्यानंतर ४५ मिनिटांनी ब्रश करा, तोंड धुवा. त्यानंतर मात्र आणखी ४५ मिनिटांचा अवकाश ठेवा.

३) यानंतर ४५ मिनिटं झाल्यानंतर तुम्ही नाश्ता करू शकतात.

४) नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यानंतर लगेच पाणी पिऊ नका, प्रत्येक वेळी पाणी २ तासानंतर प्या. 

५) हे दररोज करा, शून्य पैशात तुमची वाटर थेरपी ट्रीटमेंट सुरू झाली आहे असे समजा.

सूचना - ज्यांचं वय जास्त आहे, किंवा जे नेहमी आजारी असतात, त्यांनी अर्धा लीटर पाणी ऐवजी, चार ग्लास पाणी पिणे चांगले असेल. 

6. जे इतर आजारांवर उपचार घेत असतील, त्यांनी ही थेरपी त्या दरम्यान केल्यास त्यांना फायदा होईल, मात्र त्यांनी एकदा त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पाहा खालील आजार नियंत्रणात आणण्यासाठी किती दिवस लागतील?
१) उच्च रक्तदाब - ३० दिवस
२) पोटाचे आजार (गॅस्ट्रिक) - १० दिवस
३) डायबेटीस - ३० दिवस
४) बद्धकोष्ठता (मलावरोध) - १० दिवस
५) कॅन्सर - १८० दिवस (मोठा फरक दिसेल) 
६) टीबी - ९० दिवस 
७) संधिवातच्या रूग्णांनी ही ट्रिटमेंट पहिल्या आठवड्यात ३ दिवस, तिसऱ्या आठवड्यात ३ दिवस करावी, मात्र त्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 
या उपचार पद्धतीचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. ही पद्धत तुम्ही रोज अंगीकारली तर तुमच्या आरोग्याला मोठा फायदा होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.