दहशतवादी हल्ल्याने भारत पाक सिरीज धोक्यात

 गुरूदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आता सर्वत्र पडत असून यामुळे आगामी डिसेंबर महिन्यात भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या क्रिकेट सिरीजवर पडताना दिसत आहे. 

Updated: Jul 27, 2015, 06:00 PM IST
दहशतवादी हल्ल्याने भारत पाक सिरीज धोक्यात title=

नवी दिल्ली  :  गुरूदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आता सर्वत्र पडत असून यामुळे आगामी डिसेंबर महिन्यात भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या क्रिकेट सिरीजवर पडताना दिसत आहे. 

बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी गुरदासदासपूर हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, दहशतवाद आणि क्रिकेट हाताहात घालून खेळता येणार नाही. भाजपचे खासदार असलेले अनुराग ठाकूर म्हणाले, क्रीडा हा वेगळा विषय असला तरी भारताच्या अंतर्गत सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. 

एका इंग्रजी चॅनलशी बोलताना अनुराग ठाकूर यांनी या हल्ल्याचा निषेध केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.