...म्हणून भाजपानं बेदींना निवडलं - आरएसएस

राजधानी दिल्लीत जनमत फारसं अनुकूल दिसत नसल्यानं चिंताग्रस्त भारतीय जनता पक्षानं किरण बेदींना पक्षात आणत त्यांची 'मुख्यमंत्री'पदाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याची कबुली 'ऑर्गनायझर' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात देण्यात आली आहे. तसंच या लेखात भाजपाला धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

Updated: Feb 3, 2015, 12:29 PM IST
...म्हणून भाजपानं बेदींना निवडलं - आरएसएस title=

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत जनमत फारसं अनुकूल दिसत नसल्यानं चिंताग्रस्त भारतीय जनता पक्षानं किरण बेदींना पक्षात आणत त्यांची 'मुख्यमंत्री'पदाची उमेदवार म्हणून घोषणा केल्याची कबुली 'ऑर्गनायझर' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात देण्यात आली आहे. तसंच या लेखात भाजपाला धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

किरण बेदींची भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून निवड करण्यात आल्यानंतर पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आणि थोडा तणावही होता. त्यानंतर खुद्द संघाकडूनच बेदींच्या नेमणुकीचं कारण पुढे आलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी अवघ्या ४९ दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं दिल्लीकरांमध्ये फसवलं गेल्याची भावना असून ते दुखावले गेले आहेत, त्यामुळं त्यांची कठीण परीक्षा आहे. मात्र असं असलं गरीब वर्गातून आपल्याला अधिक पाठिंबा मिळू शकतो, अशी शक्यता असल्याचं लेखात म्हटलं आहे. 

भाजपासाठीची स्थितीही दिल्लीत फारशी समाधानकारक नसून, ही फारशी चांगली बाब नाही, हे  लक्षात आल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी किरण बेदींना पक्षात आणण्याचा निर्णय घेतल्याचं लेखात म्हटलं आहे. तसंच भाजप नेत्यांकडून होणाऱ्या नकारात्मक टीकेबाबातही लेखातून समज देण्यात आली आहे. ' नरेंद्र मोदींमुळं सोशल नेटवर्किंग साईट्स आणि सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या भाजपा नेत्यांनी ट्विटर आणि फेसबूकवर नकारात्मक कॉमेंट्स कमी केल्या पाहिजेत', असा सल्लाही देण्यात आला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.