रणबीर-कतरिनानं केली गोची

रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेक अपचा फटका दोघांच्याही व्यावसायिक आयुष्याला बसत असल्याचं दिसतंय. 

Updated: Feb 21, 2016, 03:00 PM IST
रणबीर-कतरिनानं केली गोची title=

मुंबई:  रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेक अपचा फटका दोघांच्याही व्यावसायिक आयुष्याला बसत असल्याचं दिसतंय. कतरिना आणि रणबीर अनुराग बासूच्या जग्गा जासूसमध्ये काम करत आहेत. पण गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाचं शूटिंग रखडलं आहे. 

या चित्रपटाचं आऊटडोर शूटिंगही रद्द करण्यात आलं आहे, कारण रणबीर आणि कतरिना ब्रेक अपनंतर लगेच एकत्र काम करण्यासाठी तयार नसल्याचं बोललं जात आहे.

फितूर चित्रपटाच्या शूट आणि प्रमोशननंतर कतरिना 'जग्गा जासूस'साठी वेळ देईल असं बोललं जात होतं, पण तसं काही झालं नाही. चित्रपटाच्या सेटवर रणबीर नियमीत जात असला तरी कतरिना मात्र अजूनही फिरकलेली नाही, अशी माहिती मिळत आहे. 

रणबीर आणि कतरिनाच्या अशा वागण्यामुळे अनुराग बासूची मात्र चांगलीच गोची झाली आहे. तसंच जग्गा जासूसचं भवितव्यही यामुळे अंधारात आहे.