मानव - अर्चनाचा ‘पवित्र रिश्ता’ लग्नाआधीच मोडला

अभिनेत्री अंकिता लोखंडेबरोबर प्रेम प्रकरण संपुष्टात आल्याचे अभिनेता सुशातसिंग राजपूतचे ट्विट केले.  

Updated: May 5, 2016, 03:46 PM IST
मानव - अर्चनाचा ‘पवित्र रिश्ता’ लग्नाआधीच मोडला title=

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेबरोबर प्रेम प्रकरण संपुष्टात आल्याचे अभिनेता सुशातसिंग राजपूतचे ट्विट केले. त्यामुळे छोट्या पडद्यावरुन पुढे आलेल्या मानव - अर्चना जोडीचा ‘पवित्र रिश्ता’ खऱ्या जीवनात मोडलाय.

आधी पडदा टाकण्याचा प्रयत्न

अनेक दिवस उलट-सुलट बातम्या येत होत्या. मानव अर्थात सुशांत सिंग राजपूत आणि अर्चना अर्थात अंकिता लोखंडे यांच्यात ठिक नसल्याचे वृत्त होते. मात्र, अंकिताने हे सर्व खोटे असल्याचे सांगत मी जेवढे प्रेम करते तेवढेच तो करतो, असे सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुशांतने याबाबत तोंड उघडले नव्हत.

 ब्रेकअप ट्विट

सुशांतसिंगने ट्विट करत अंकितासोबत ब्रेकअप झाल्याची अखेर कबुली दिलेय. गेल्या सहा वर्षांपासून हे दोघेही ‘लिव्ह इर रिलेशनशिप’मध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये त्यांच्या ब्रेकअपबद्दल चर्चा सुरू होती. पण दोघांकडून अधिकृत सांगण्यात येत नव्हते. मात्र, सुशांतने ट्विट करुन स्पष्ट केलं, आमचं मोडलं.

विवाह होणार होता...

सुशांतसिंग राजपूतने या वर्षाच्या अखेरिस आपण अंकिता लोखंडेसोबत विवाह करणार असल्याचे म्हटले होते. पण त्यानंतर या दोघांमध्ये दुरावा निर्माण होत गेला आणि अखेर दोघांमध्ये ब्रेकअप झाले. यापूर्वी अंकिताला पत्रकारांनी याबद्दल विचारल्यावर तिने कायम त्याचा इन्कार केला होता.