अमरावतीत विषबाधेनं एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील झोलंबा गावात एकाच कुटुंबातील चार लहान मुलांचा अन्नातून विषबाधा झाल्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. या घटनेत आणखी एका लहान मुलीची प्रकृती खालावली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Updated: Apr 1, 2015, 12:35 PM IST
अमरावतीत विषबाधेनं एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू title=

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील झोलंबा गावात एकाच कुटुंबातील चार लहान मुलांचा अन्नातून विषबाधा झाल्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. या घटनेत आणखी एका लहान मुलीची प्रकृती खालावली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

झोलंबा गावात एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचं नुकतंच निधन झालं होतं. या मृत व्यक्तीच्या तिसऱ्याचं कार्य असल्यानं घरात नातेवाईक आले होते. तिसऱ्याचं जेवण झाल्यावर घरातील लहान मुलांना त्रास सुरु झाला. यातील चौघा मुलांचा मृत्यू झाला तर तीन वर्षाच्या एका मुलीची प्रकृती खालावली. 

विषबाधा नेमकी कशातून झाली याचा तपास सुरु आहे. मात्र एकाच कुटुंबातील चार लहान मुलांचा मृत्यू झाल्यानं गावावर दुःखाचा डोंगर सुरु कोसळला आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.