नोट बंदीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका

सरकारचा नोटा बंदीचा निर्णय आता कृषी पुरक उद्योगाना ही सताऊ लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शेती पूरक व्यवसाय म्हणून कुकटपालनाचा व्यवसाय केला जातो तर काही सुशिक्षित बेरोजगार पूर्ण वेळ हा व्यवसाय करीत असतात सरकारच्या हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका या व्यवसायला बसला आहे या निर्णयामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात जवळपास ४० टक्के नुकसान सहन करावे लागते आहे.

Updated: Nov 26, 2016, 08:43 PM IST
नोट बंदीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका  title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : सरकारचा नोटा बंदीचा निर्णय आता कृषी पुरक उद्योगाना ही सताऊ लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शेती पूरक व्यवसाय म्हणून कुकटपालनाचा व्यवसाय केला जातो तर काही सुशिक्षित बेरोजगार पूर्ण वेळ हा व्यवसाय करीत असतात सरकारच्या हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका या व्यवसायला बसला आहे या निर्णयामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात जवळपास ४० टक्के नुकसान सहन करावे लागते आहे.

कुकटपालनाचा व्यवसाय हा नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केला जातो त्यातून अंडी आणि मास याचा विक्रीतून  व्यवसाय केला जातो.  मात्र नोट बंदी झाल्या नंतर अंडी खरेदी करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या मार्फत या अंड्याची आणि कोंबड्याची विक्री होते.  

कुकुटपालन करीत असताना लहान पिले आणून त्यांचे संगोपन केले जाते तीन महिन्या नंतर हे पिल्ले विक्री साठी किवा अंड्यांसाठी तयार होतात त्यावर एका पिला मागे तीन महिन्यात ३० रुपये खर्च होत असतात. या  नोट बंदीच्या सर्वाधिक फटका अंडे उत्पादन घेणाऱ्या कुकटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना बसला आहे. कारण अंडे नाशवंत असल्याने त्यांचा साठा ही करून ठेवता येत नाही आणि हा व्यवसाय रोखीचा असल्याने नोट बंदीमुळे अंड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा फटका शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या अनेक घटकांना बसला आहे.

अगोदर अंडे ४ रुपये ३० पैसे प्रती नग विक्री होत होती आता त्याचा दर 3 रुपयापर्यत खाली पडला आहे तर जिवंत पक्षी १०० रुपये किलो दराने  विक्री होणारी कोंबडी आता ५० ते ६० रुपये किलोने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे या व्यवसायात ४० टक्के नुकसान येत आहे. त्यातच अंडी ही नाशवंत असल्याने मिळेल त्या पडलेल्या दरात अंड्याची विक्री केली जात आहे

नोटबंदीचा निर्णयाचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला आहे या व्यवसायात ४० टक्के नुकसान होत असल्याने शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा आर्थिक कणा मोडून पडला आहे त्यांना या व्यवसायात नवीन उभारी घेण्यासाठी अजून तीन ते चार महिन्याचा कालवधी लागणार आहे .