खळबळजनक, एकाच घरातील सहा जणांची आत्महत्या

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आज दुपारी एकाच कुटुंबातील ६ जणांनी सामूहिक आत्महत्यांची केल्याची घटना उघडीस आली या घटनेने  मुले संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

Updated: Jun 28, 2016, 08:08 PM IST
खळबळजनक, एकाच  घरातील सहा जणांची आत्महत्या  title=

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आज दुपारी एकाच कुटुंबातील ६ जणांनी सामूहिक आत्महत्यांची केल्याची घटना उघडीस आली या घटनेने  मुले संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

  
एकाच कुटुंबातील दोन  भाऊ दोन बहिणी आणि दोन तरुण मुलीनी सामूहिक आत्महत्या केल्यामुळे  यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काठीपुरा या भागातील चव्हाण आणि बारड कुटुंबातील ६ सदस्यांनी सामूहिक रित्या विषारी औषध घेऊन  जीवन यात्रा संपविली. काठीपुरा परिसरातील घरातच किराणा दुकान होते, परिसरामध्ये मनमिळाऊ स्वभावामुळे याची ओळख होती, मात्र काल रात्री या कुटुंबातील सर्व ६ सदस्यांनी जेवण करून झोपल्यानंतर आज सकाळी आणि दुपारपर्यंत दुकान ही उघडले नसल्याने आणि घरात कुठलेही हालचाली आल्यामुळे शेजारी राहणाऱ्यांनी घरात जाऊन बघितले असता, विवेक नारायण चव्हाण , मंगला नारायण चव्हाण , लश्मी नारायण चव्हाण, प्रफुल चव्हाण हे चार  बहीण भाऊ आणि याच्या दोन भाच्या कुमारी मालिनी बारड, रोशनी बारड हे ६ जण मृत अवस्थेत आढळले. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली व ही घटना उघडीस आली 

पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेतली असून घटना स्थळी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन घटना स्थळावर  २ बाटलीत विषारी औषध जप्त करण्यात आली. या बाबत पोलीस तपास सुरू असल्याचे माहिती अमरावती पोलीस जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी  सांगितले