मंत्रालय कर्मचाऱ्यांसाठी: तासभर उशीरा या पण वेळ भरून जा!

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आता रोज सकाळी एक तास उशिरानं कामावर येण्याची मुभा असेल, पण ते जितक्या उशिरानं कामावर येतील तितकं जास्त काम त्यांना सायंकाळी ५.३० नंतर करावं लागेल.

Updated: Jan 1, 2015, 10:42 AM IST
मंत्रालय कर्मचाऱ्यांसाठी: तासभर उशीरा या पण वेळ भरून जा!  title=

मुंबई : मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना आता रोज सकाळी एक तास उशिरानं कामावर येण्याची मुभा असेल, पण ते जितक्या उशिरानं कामावर येतील तितकं जास्त काम त्यांना सायंकाळी ५.३० नंतर करावं लागेल.

१ जानेवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रालय कर्मचाऱ्यांनी सकाळी ९.४५ला कामावर हजर राहावं, असा नियम आहे. त्यांना आतापर्यंत १० मिनिटांचा ग्रेस पीरिअड दिला जायचा. दोन दिवस १० मिनिटांहून जास्त वेळ झाला तर तिसऱ्या उशिरास एक नैमित्तिक रजा आतापर्यंत कापली जात होती.

सामान्य प्रशासन विभागानं बुधवारी एक आदेश काढून या नियमात बदल केला. आता सकाळी ९.४५ ते १०.४५ या वेळात कर्मचारी, अधिकाऱ्यांना केव्हाही कामावर येता येईल. मात्र या वेळात ते जितकी मिनिटं उशिरानं येतील तितकी मिनिटं त्यांना सायंकाळी ५.३० ला कामाची नियमित वेळ संपल्यानंतर काम करावं लागेल. मुंबईतील कर्मचाऱ्यांना दूरवरून मंत्रालयात यावं लागत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.