अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान

राज्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. खानदेश, मराठवाड्यासह कोकणातही अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. 

Updated: Mar 1, 2015, 11:48 AM IST
अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान title=

मुंबई : राज्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. खानदेश, मराठवाड्यासह कोकणातही अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. 

कोकणात आंब्याला मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे गहू, हरभरा, कांदा पिकाला तर द्राक्ष, डाळिंब सारख्या फळबागेलाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. पाऊस आणि वादळाचा मोठा फटका राज्यातील शेतीला बसला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.